कोर्टाच्या कामानिमित्त मला पालघर येथे जाण्याचा योग आला. त्या वेळी प्रथमच ज्येष्ठ वकील अॅड. सुरेश तानाजी महाडिक सर न्यायालयाच्या आवारात भेट झाली… आणि खरंच सांगतो, ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली.
पहिल्याच भेटीत त्यांनी दाखवलेला आदर, आपुलकी, सहकार्याची भावना आणि मनापासून केलेले स्वागत हे शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. चहाचा आग्रह असो, सायंकाळी थांबण्याची विनंती असो किंवा त्यांच्या फार्महाऊसवर केलेली उत्तम राहण्याची व्यवस्था — हे सर्व त्यांच्या मोठ्या मनाचे आणि सहकारी वकिलांप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे द्योतक आहे.
आजच्या काळात अशी माणसं खूप कमी भेटतात…
जे स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देतात, जे नेहमी मदतीचा हात पुढे करतात, आणि जे वकिलांच्या हितासाठी खऱ्या अर्थाने झटतात.
खरं सांगायचं तर,
ज्युनियर वकिलांप्रती माया, सहकारी वकिलांप्रती आदर आणि सहकार्याची भावना
आज कमी होत चालली आहे.
पण अॅड. सुरेश तानाजी महाडिक सर यांच्यासारखी व्यक्ती भेटली की पुन्हा एकदा जाणवतं —
“वकील हा व्यवसाय नसून एक Noble Profession आहे.”
अशा भावना केवळ बोलण्यात नाही, तर आचरणात दिसल्या पाहिजेत…
त्या वाढल्या पाहिजेत, रुजल्या पाहिजेत.
आणि म्हणूनच, इतर वकिलांनीही अशा आदर्श वागणुकीचे अनुकरण करणे ही काळाची गरज आहे.
अॅड. सुरेश तानाजी महाडिक सर यांचे व्यक्तिमत्त्व या सर्व गुणांनी परिपूर्ण आहे.
ते पालघर वकील संघटनेच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे आहेत हे ऐकून मनापासून आनंद झाला…
आणि अंतर्मनातून असे वाटते की, सर्व वकील बंधू-भगिनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील.
त्यांचे हे चांगले कार्य, सहकार्याची भावना आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती अशीच यापुढेही अखंड सुरू राहो, हीच माफक अपेक्षा असेल
अशा सहकार्यशील, प्रामाणिक आणि संघटनेचे हित जपणारे उमेदवार सगळ्या संघटनेच्या निवडणुकीत उभे राहतात,
तर त्यांनाच ठामपणे निवडून द्या.
जातीपातीचे राजकारण करून निवडून आलेल्या व्यक्तीकडून
ना बारची प्रगती होते, ना वकिलांचे प्रश्न सुटतात…
उलट ज्युनियर वकिलांच्या अडचणी अधिकच बिकट होत जातात.
“सगळं मलाच पाहिजे” ही स्वार्थी भावना मोडून काढली पाहिजे.
चला, आपण सर्वांनी अशा चांगल्या विचारांचे अनुकरण करूया
आणि वकिली व्यवसायातील आदर, जिव्हाळा व सहकार्याची परंपरा अधिक बळकट करूया!
Post a Comment
0Comments